Design a site like this with WordPress.com
Get started

कट्टा विधानसभानाम चर्चास्य कॅरेक्टरम् ढासळम्…!

avatibhavati.in

वाचायला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो….हे कसलं शीर्षक ? नक्की कोणत्या भाषेतील ? असला कोणताही थुकरट सवाल मनात न आणता ही सोशल मीडिया मुक्त विद्यापीठाची स्वतंत्र भाषा आहे असा समज करून आत्मसात करावी. मग मराठी की इंग्लिश की संस्कृत किंवा पाली, हिब्रू, मोडी असे सामान्यज्ञानाचे ‘तारे’ तोडणारे बुद्धिकौशल्य न वापरता बात को समझो ना यार……तर मराठी भाषेतील प्रस्तावना पूर्ण करून मूळ विषयाला सुरुवात करूयात……

सध्या राज्यात सत्तांतरामुळे उडालेल्या चर्चेचा (कट्ट्यावरची विधानसभा) रोख आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा राहिला नाही. देवेंद्रजी यांचातर पूरपरिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांनी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा देखील केला.(दरवर्षी नित्यनेमाने येणारा वाढदिवस थोडीच थांबणार ?) तर एकनाथरावांच्या नातूप्रेमासह फॅमिली फोटोसेशन देखील झाले आहे. आता मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि रुसवेफुगवे याचा अंक झाला की मग दोन वर्षे किरकोळ धुसफूस वगळता कट्टा विधानसभेत फार मोठ्या चर्चा झडतील असे काही वाटत नाही. मग गल्लीतील कट्टा विधानसभा चालणार कशी ? कट्टा विधानसभा देखील लोकशाहीच्या संकेतानुसारच लोकांमधून निर्वाचित (गल्लीतून पुरेसा…

View original post 688 more words

#अभ्यास

अभ्यास
अभ्यास काय आहे…?
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.
आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.
शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..
थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!

प्रेम

मनमोकळे या आभाळाप्रमाणे प्रेमाच्या किरणं प्रवेशास

खूप सारे पुस्तक वाचले…. खुप चित्रपटही ( मराठी, हिंदी, साऊथ, हॉलीवूड…. ) पाहीले….. खुप लोकांशी चर्चा ही केली… पण प्रेमाची ठरावीक अशी कोणतीच व्याख्या, संकल्पना मला करता आली नाही. पण यातून मला काही गोष्टी नक्कीच निदर्शनास आल्या… आज त्याच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे.

कोणतीही व्यक्ती असो…. प्रत्येकाच पहिल प्रेम आई असते… पण हे कोणी मानत तर कोणी नाही… आपल्या असण्याची पहिली चाहूल सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईलाच लागते… मग इतरांना… आपल्या पहिला प्रेमाचा स्पर्श ही आपल्या आईचाच होतो… त्या आपल्या लाता मारण्यानी ही आई खुश होत असती…. सगळे कष्ट स्वतःहा सहन करत…. काही महिने आपल्याला तिच्या पोटात जागा देते… अन् नंतर ही ती आपल्याला पालथं पडण्यापासून,बसण्यापासुन, उभा राहण्यापर्यत अन् रडण्या पासून बोलण्या पर्यंत आपल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीत ती आपल्या सोबत असते… अन् तेही प्रेमानीच…

पुढे आपल्याला कळायला लागतं तसं तसं तिच्या प्रेमळ कौतुकाच रुपांतर रागवण्यात होतं… पण तेही आपल्याच चांगल्या साठी… आई असो वडील असो आपल्यावर जगातील सर्वात जास्त प्रेम करत असतात… त्याच ते प्रेम काळजी, राग , हक्क आदी गोष्टीतून पुढे येत असत… पण आपल्याला ते वेगवेगळे रूप दिसतात.. पण त्यातील प्रेम खुपचं कमी जणांना जाणवत… ज्यांना जाणवत अस वाटतं तेही फक्त कर्तव्याच्या दृष्टीने त्याकडे पाहत असतात…… तिच्या या निरागस प्रेमास huge माहित नसतो माहित असतं ते फक्त प्रेमळ कुशीत घेण… कवटाळणं… अन् नसतं ते आपलं kiss ही माहिती असतं ते फक्त प्रेमळ गालावर चुंबन घेणं….

आई-वडीलांनच असो, बहिण -भावाच असो, आपल्या चांगल्या मित्र-मैत्रिणीच असो… प्रेम सगळ्यांचं असतं आपल्यावर… पण ते आपल्याला बांधुन ठेवणार कधीच नसतं… काळजी पोटी कधीकधी बंधन वाटतात पण आपण आपली काळजी ते घेतात तेवढीच घेऊ शकतो हा विश्वास त्यांना दिला की उरलेसुरलेले बंधन ही नाहींशी होतात…. एवढं सुंदर, निर्मळ, निस्वार्थ, प्रेम आपल्या जवळ असतानाही आपल्या आसपासचे सर्वचजण इतरत्र ते शोधत असतानी आपल्याला दिसतात… असं का होतं..? तर आपण आता प्रेम ज्याला समजतो ते प्रत्येकाच्या समज कक्षेतील ज्याची त्याची वेगवेगळी कल्पना आहे… अन् ती कल्पना आपण वरील लोक सोडुन बाहेर शोधत असतो… अन् तसं आपल्याला मिळालं तर ठिक.. अन् ती कल्पना किती दिवस तग धरते त्यावर ते प्रेम अवलंबून असते….

आपल्या प्रेमानी समोरच्याला त्रास होत असेल तर खरंच ते प्रेम आहे का.. हा एक प्रश्न आहे..? आपल्या प्रेमानी कुणालाही बांधुन ठेवल्या सारखं वाटतं असेल तर नक्कीच एकदा विचार करा की… याला प्रेम म्हणतात की नाही… ? प्रेमात मोकळं वाटलं पाहिजे, पुढे जाण्यास नवी उमेद निर्माण झाली पाहिजे… अन् असं आपल्याला कुणाच्या जिवनात मोकळीक निर्माण करता येतील का… नवी उमेद बनता येईल का ..? यावर नक्कीच विचार केला पाहिजे…

प्रेम नावाची कल्पना खुपचं मस्त आहे … ती मग प्रत्येकानुसार वेगवेगळी का असेना… ती नक्कीच जगावी…. त्या नावाखाली स्वतःला ही अन् दुसऱ्याला ही त्रास न होऊ देता… ती नक्कीच अनुभवावी…. स्वतः वर प्रेम करा… मग बाहेर प्रेमचं प्रेम जाणवेल…. माझ्यावर प्रेम करणाऱ्या मला स्वतःला, आई-वडील , बहिण -भाऊ, मित्र-मैत्रिणी, आणि ज्या नात्यांना नाव नाही तरीही त्यात असणाऱ्या सर्वांना मला या सुंदर अश्या प्रेमाची अनुभूती दिल्या बद्दल धन्यवाद….

माझं पहिल प्रेम

स्पर्धा परीक्षेच वेड प्रेम

अभ्यास…


अभ्यास काय आहे…?
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.
आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.
शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..
थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!

अथांग पसरलेल्या या डोंगराच्या पायथ्याशी पाण्याचा डोह मनमोहनारा

दृष्टिकोन

एकदा वर्गातून सर्वांचा आग्रह करण्यात आला एक छानशी गोष्ट सांग , पण गोष्ट कोणती सांगावे याचा विचार करत होते तेवढ्यात विचार आला…. चला आज एक मस्त ‘ प्रेम कहाणी’ सांगावी तर ऐका मग…

एका महाविद्यालयात रासायनिक विभागात एक आकाश नावाचा विद्यार्थी होता खूप शांत अन् अभ्यासात हुशार. त्याच्याच महाविद्यालयात एक मेघा नावाची मुलगी देखील होती. दिसायला खूपच सुंदर . एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली, नंतर सतत भेटणं सुरू झालं आणि पुढे काहीच दिवसात ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं .

एक दिवस आकाश शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयात द्वारे एका मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागला . दोघांनी घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले. घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली. दोघांचं लग्न झालं सोबत राहायला गेली, एक मस्त घर घेतलं होतं. एका नदीकाठी निवांत घर होतं. दोघे मजेत राहत होते.

आकाशला एक दिवस सकाळी कंपनीतून अचानक फोन येतो , त्याला तेव्हा समजतं की त्याला कंपनीच्या एका प्रोजेक्ट निमित्त चार दिवसासाठी परदेशात जावे लागणार आहे. तसे तो मेघाला सांगतोय अन् त्याला आजच निघावे लागणार होतं . त्यामुळे तो घरातली मेघा साठी आवश्यक असणारे सगळ्या गोष्टींची सोय करतो. जास्तीचा गॅस भरला, धान्य भरून ठेवली, गाडीत डिझेल फुल भरल, इत्यादी आणि तो जातो. मेघा घरात एकटी असल्याने तिला करमत नाही, म्हणून ती रोज सायंकाळी नदीकाठी फिरायला जात असे . नदीवरील पूल ओलांडून दुसऱ्या किनारी आपला वेळ घालवत असते. तिथे तिच्या एका पेंटर मुलाशी ओळख होती तो रोज तिथे सायंकाळी पेंटिंग काढण्यासाठी येत असे. दोघांची चांगली मैत्री होती.

असे चार दिवस संपतात व आकाश आज सायंकाळी घरी येणार असतो. रोजच्याप्रमाणे मेघा आकाश यायला वेळ आहे तोपर्यंत नदीकाठी जाऊन येनं होईल म्हणून नदीकाठी जाती. रोजच्या प्रमाणेच फेरफटका मारून पेंटर मित्राशी गप्पा करून घरी येण्यास निघाली. पण आभाळ भरून आलं होतं चांगलंच, त्यामुळे सूर्य मावळायला अजून वेळ असूनही अंधार दाटून आला होता .जोराचा वारा सुटला होता. नदीकाठी पाणी हळूहळू वाढत होतं. ती लगबगीने घरी जाण्यासाठी गाडी कडे गेली. गाडी सुरु केली आणि घरी निघाली पण पूला जवळ येताच रस्ता बंद केलेला दिसला. गाडीतून उतरत चौकशी केली तर समजलं पूल चांगला नाही. म्हणून नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे वाहनास आज तरी परवानगी नाही मिळणार . तिच्या खूप विनंतीही वॉचमन नी ऐकलं नाही. नावेतून नदीपार करावा असा सल्ला दिला असून तो लवकरच. मेघा नाव वाल्या कडे गेली , बऱ्यापैकी सगळेच नाव वाले घरी परतले होते. तेवढ्यात तिच्या नजरेस एक नाव पडली , तिही जायला लागलेली होती. आवाज देत नाव थांबवली व नदी पार करण्यासाठी विनंती केली. पण मेघा कडे पैसे नसल्याने तो तयार होत नाही. त्याची पण दिवसभर कामे झालेली नसते घरी त्याची बायको मुलं वाट पाहत असतात व नदीपार केल्यानंतर तिथून थोडे लांब राहत असल्याने तो काही मान्य करत नव्हता. मेघा पळतच आपल्या चार दिवसाच्या पेंटर मित्राकडे जाती तोही पावसाचे वातावरण बघून जायला आवरत असतो, ती त्याला सगळं सांगते व घरी जाण्यासाठी पैसे मागते, परंतु तो नाही म्हणतो , एवढ्या कमी दिवसाच्या मी पैसे कसे देऊ आणि तोही नकार देतो. घरी फोन करुन आकाशाला आला असेल तो घेण्यासाठी येईल परंतु तिने मोबाईल घरी विसरून आली होती.

अशी होती मेघाची अन् आकाश ची छोटीशी कहाणी. नंतर मेघा काहीतरी करून घरी गेली असेलच. तुम्ही म्हणाल मी तर प्रेम कहाणी सांगणार होते मग ही कोणती कहाणी सांगितली. बरोबर ना असं बोलून वर्गातील असणाऱ्या सर्वांना एक प्रश्न विचारला..,.. तो प्रश्न असा की, या गोष्टीतील पाच पात्र आहेत त्यातील चूक कोणाची…? कोणी या गोष्टीत वेगळी कृती केली असती तर गोष्टीचा शेवट छान झाला असता. वर्गातील सर्वानी उत्तरे दिली . त्यानुसार सहा गट पडले . कोणाला वाटत चुक मेघाची आहे. कुणाला नाव वाल्याची तर कोणाला त्या पेन्टरची, तर कुणाला कोणाची चूक वाटत नव्हती…. तात्पर्य : गोष्ट एकच होती सांगण्याचा वेळही एकच होता… पण ऐकण्याचा दृष्टीकोन आणि त्यावर विचार करण्याचा दृष्टीकोन वेगळा होता…. म्हणून एकाच प्रश्नावर पाच ते सहा प्रकारे उत्तर आले …त्यामुळे खूप काही गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात. त्यामुळे दृष्टिकोन चांगला ठेवला तर वाईट गोष्टीतही चांगल्या गोष्टी सापडतील.

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

प्रतिलिपि वर वाचा – “छंद”

“छंद”, वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-mhvdcgpysm6s?utm_source=android&utm_campaign=content_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!